कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांनी उभारलेल्या शेतकरी आंदोलनाला आता मनोज जरांगे पाटील यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. मराठा आणि शेतकरी प्रश्नांवर लढा देणारे दोन्ही नेते आता एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पाठिंब्यामुळे आंदोलनाला आणखी बळ मिळालं आहे.
मनोज जरांगे पाटील हे आज बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी नागपूरमध्ये आले आहेत. बच्चू कडू यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील नागपूरमध्ये आले आहेत. बच्चू कडू हे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जोपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा बच्चू कडू यांनी घेतला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक झाले आहे. ते नागपूर येथे जेलभरो आंदोलन करत आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांना समर्थन देण्यासाठी मनोज जारंगे पाटील नागपूरला आले. बच्चू कडू आणि मनोज जरांगे या दोघांमध्ये चर्चा झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.