आरक्षणाच्या मागणीसाठी 25 जानेवारीपासून आम्ही आमरण उपोषण करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाविषयी येत्या 25 तारखेपर्यंत काय निर्णय घेतात, याकडे आमचं लक्ष लागलं आहे, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे. याआधी देखील सरकारमध्ये हेच लोक होते, आता केवळ खांदे बदलले असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना जरांगेंनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर देखील भाष्य केलं. ते म्हणाले की, वाल्मिक कराडला अटक झाली आहे, आता मोठे मासे सापडतील. पोलिसांनी लवकर फरार आरोपींना अटक केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसंच या प्रकरणात पोलिस कुणालाही सोडणार नाहीत. सर्व आरोपींना अटक होऊन न्याय मिळावा अशी आमची इच्छा आहे. आरोपींना अटक नाही झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.