महायुती सरकार स्थापन झाल्यापासून पालकमंत्रीपदावरून युतीत रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले होते. सरकार स्थापन झाल्यानंतर महिनाभराने पालकमंत्री जाहीर झाले. मात्र, काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला स्थगिती दिली. नाशिकच्या तुलनेने रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून अदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात संघर्ष सुरू आहे. अशातच आज राष्ट्रवादीने आज राज्याच्या सर्व माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी मंत्री भरत गोगावले यांचा खासदार सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी तिघांमध्येही खेळीमेळीचे वातावरण पहायला मिळाले. तसेच पालकमंत्रीपदाचा तिढा कधी सुटेल असा प्रश्न भरत गोगावले यांना विचारला असता ते म्हणाले, लवकरच चमत्कार होईल असे सूचक वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.