लोकसभा निवडणुकीनंतर आता काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर राज्यात वाढली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं विधान केलं आहे. काँग्रेस विधानसभेच्या 150 जागा लढवण्याच्या विचारात असल्याचं नाना पटोले यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलंय. त्यामुळे महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची रणनिती काय असणार, यावरुन आतापासूनच तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं. त्यात सर्वाधिक जागा या काँग्रेसने जिंकल्या. त्यामुळे आता विधानसभेतही काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ ठरणार का? यावरुन चर्चांनाही उधाण आलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.