धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील समावेशासाठी महाराष्ट्र शासनाकडून केंद्र शासनाकडे कुठलाही प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही असा खुलासा सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केला आहे. आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते. धनगर आरक्षण प्रकरणी काही लोक माझ्या नावाने ओरडत होते. मी घरी नसताना माझ्या घरासमोर ढोल वाजवले गेले. मी माझा शब्द पाळला. मी संसदेत आरक्षणाचा प्रश्न मांडला. त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केंद्र शासनाकडे पाठपुराव्यासाठी राज्याकडून तांत्रिक सहा कार्य मिळावं अशी मागणी केली. त्यामुळे आरक्षण प्रश्नावरून कुणीही राजकारण करू नये असेही ते म्हणाले. पुढे विशाल पाटील म्हणाले, मी धनगर आरक्षणासंदर्भात संसदेत प्रश्न मांडला आणि लेखी उत्तराची मागणी देखील केली त्यावर जनजाती मंत्रालयाकडून नुकतेच उत्तर मिळाले ते अतिशय धक्कादायक होते सन 1971 ला राज्य सरकारने धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाबाबत प्रस्ताव दिला होता मात्र पुन्हा 1981 ला धनगर समाज संबंधित निकष पूर्ण करत नसल्याबाबत अहवाल सादर केला त्यानंतर या मंत्रालयाकडे धनगर समाज आरक्षण बाबतचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही असे ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.