Maharashtra Farmer News SaamTv
Video

Farmers News : सरकार शेतकऱ्यांना देणार 50 हजार; बघा काय आहे योजना

Saam Tv

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी आधार प्रमाणीकरण मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेला 18 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात, त्यांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचा लाभ प्रशासनाकडून दिला जाणार आहे. मृत शेतकऱ्यांच्या वारसांनासुद्धा बँकेत वारसा नोंद केल्यास या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारने 2019 मध्ये महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत हा लाभ आता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. सरकारकडून 12 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरदरम्यान आधार प्रमाणिकरणासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र यात अद्याप 16 हजार शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण झालं नसल्यानं आता या मोहिमेला 18 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ सरकारकडून देण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT