नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीबाबत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. या संपूर्ण घटनेची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे दोघेही नागपूरचे असताना, पोलिस प्रशासनाला परिस्थिती हाताळता येत नाही, ही गंभीर बाब आहे.
दानवे पुढे म्हणाले की, गेल्या महिन्याभरापासून राज्य सरकार हिंदू-मुस्लिम दंगल घडवून आणण्याचे षडयंत्र रचत आहे. जनतेचे सामान्य जीवन विस्कळीत करून, समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. हिंदू आणि मुस्लिम दोघांचेही जनजीवन उद्ध्वस्त करून, केवळ राजकीय पोळी भाजण्याचा सरकारचा हेतू स्पष्ट दिसत आहे.
दानवे म्हणाले, या दंगलीमागे भाजप आणि त्यांच्या अंगीकृत संघटना कार्यरत असून, संपूर्ण राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या परिस्थितीला संपूर्णपणे राज्य सरकार जबाबदार असून, त्यांना या जबाबदारीतून मोकळं होता येणार नाही, असे म्हणत त्यांनी भाजपसह सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.