लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील राणी अंकुलगा येथील शेतकरी सुनील गुराळे यांचे संपूर्ण सोयाबीन पीक पुराच्या पाण्यात वाहून गेले. अचानक आलेल्या पुरामुळे मेहनतीने उभं केलेलं पीक पूर्णपणे नष्ट झाल्याने गुराळे यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे. दरम्यान, आपल्या हक्काच्या पिकाच्या झालेल्या नुकसानीची व्यथा त्यांनी गायनाच्या माध्यमातून मांडली आहे. त्यांच्या या भावनिक गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकांना डोळ्यात पाणी आणणारा ठरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.