हवामानातील बदलामुळे यावेळी कोकणातील आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. आंबा बागायतदारांना हेक्टरी पाच लाख आणि काजू बागायतदारांना हेक्टरी तीन लाख रुपये इतकी नुकसान भरपाई दिली जावी, या मागणीसाठी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा नेणारच असल्याचा ठाम निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केला होता. मात्र त्यांना पोलीस परवानगी नाकारण्यात आली. तरी देखील त्यांनी मोर्चा काढला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाली. महादेव जानकर आणि राजू शेट्टी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.