जळगावच्या भडगावमध्ये संतापजनक घटना घडलीय. भडगाव शेतकरी संघाच्या भोंगळ कारभारामुळे ज्वारी खरेदीचे टोकन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागल्या. त्यामुळं शेतकऱ्यांची गर्दी झाली. त्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
शेतकऱ्यांनी शेतकरी संघासमोर टोकनसाठी मंगळवारी गर्दी केली होती. शेतकरी रांगेत भर उन्हात उभे होते. पण संबंधित प्रशासनाने त्यांच्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नव्हती. त्यांच्यासाठी ना पिण्याचे पाणी ना सावलीची सोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी जाब विचारायला सुरुवात केली. काही वेळ गोंधळ झाल्याचे पाहून पोलीस तिथे आले. त्यांनी शेतकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला.