काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी मंगळवारी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात 28 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवादी हे पोलिसांच्या वेशात होते. त्यामुळे पर्यटकांना त्यांचा संशय आला नाही. या घटनेने संपूर्ण देश हा सुन्न झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, तिन्ही दलाचे प्रमुख आणि सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बैठकीचे सत्र सुरू आहे. त्यामुळे भारत कारारा जबाव देणार अशा चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.