मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीला पूर आला आहे. या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव, सांडस, सालेगाव, नांदापूर, टाकळगव्हाण सावंगी, कोंढुर , रुपुर चाफणाथ, हरवाडी , माळधावंडा यासह परिसरातील पंचवीस गावातील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमीन पुराच्या पाण्याने बाधित झाली आहे. दरम्यान सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग यासह हळद पीक आडवे झाले आहे. सोडेगाव परिसरात तर ७२ तासानंतर देखील शेतकऱ्यांच्या शेतात गुडघाभर पाणी साचले आहे.
हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना आणि फळबागांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव परिसरात असलेल्या कयाधू नदीकाठच्या शेतीला या पुराच्या पाण्यामुळे बाधा झाली आहे. शेतपीकाचे मोठे नुकसान झाल्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे. दरम्यान दरवर्षी पुराच्या नुकसानीला वैतागून सोडेगाव येथील शेतकरी दत्तराव काळे यांनी मोसंबी बागेची लागवड केली. मात्र ही मोसंबी तोडणीला आली असताना कयाधू नदीचे पुराचे पाणी त्यांच्या शेतात घुसले आणि हातातून अशी आलेला घास या पुराने हिरावला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.