पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. या मोहिमेद्वारे अनेक मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
यानंतर पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे हल्ले सुरू करण्यात आले. मात्र भारतीय सैन्याने तात्काळ प्रत्युत्तर देत सर्व ड्रोन हाणून पाडले. या घटनांनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठ्या प्रमाणावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
मात्र काही दिवसातच अमेरिकेने मध्यस्थी करत हा संघर्ष थांबवण्यासाठी युद्धविराम घडवून आणला. युद्धविराम जाहीर झाल्यानंतरही काही ठिकाणी सतर्कतेचा इशारा कायम आहे.
विशेषतः मुंबईसारख्या संवेदनशील भागात ड्रोन उडवण्यावर अजूनही बंदी लागू आहे. मुंबई पोलिसांनी इशारा दिला आहे की, बंदी असूनही कोणी ड्रोन उडवताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.