राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मनोज जरांगे यांनी आज घटनास्थळाला भेट दिली. कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केल्यानंतर जरांगे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना यात कोणीही राजकारण करू नये, जे छत्रपतींच्या जीवावर राजकारण करत आहेत त्यांना आपण जास्त शहाणे असल्यासारखे वाटत आहे. एकमेकांवर चिखल फेक करू नका जनता तुम्हाला सोडणार नाही. ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये झालेल्या राड्यावर बोलताना जरांगे यांनी राडा करणाऱ्यांचे ध्येय फक्त खुर्च्या मिळविणे हेच आहे. ह्यांना दुःख नाही जर दुःख असते तर राडा केलाच नसता, आपापसात आंदोलन करून तुम्ही हे प्रकरण जिरवू असे वाटत असेल तर हे प्रकरण जिरणार नाही आम्ही जिवंत आहोत असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.