बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले होते. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती. या प्रकरणात महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप झाले होते. भाजपचेच आमदार सुरेश धस यांनी मुंडे यांना लक्ष्य केलं होतं. आता या प्रकरणात दाखल तिन्ही गुन्ह्यांत कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. सूत्रधार हा वाल्मिक कराड असल्याचा उल्लेख त्यात आहे. तपास यंत्रणांनी कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्राबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना सोडणार नाही. पुराव्यानिशी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होईल अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे.
महिलांवरील अत्याचार, बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी, तसेच अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अतिशय वेळेत आरोपपत्र कसं दाखल होईल यावर नुकतीच बैठकीत चर्चा झाली. ड्रग्जच्या संदर्भात कशा प्रकारची कारवाई सुरू आहे. पुढे कशी कारवाई झाली पाहिजे यासंदर्भातही चर्चा झाली.
ड्रग्जच्या संदर्भात झिरो टॉलरन्स धोरण अवलंबलं आहे. कुठलाही पोलीस मग तो कुठल्याही रँकचा असो, ड्रग्ज प्रकरणात त्याचा थेट संबंध आला तर, सस्पेंड न करता थेट बडतर्फ करण्यात येईल, असे धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.