भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज अहिल्यानगरमध्ये जुना आक्रोश मोर्चामध्ये एक इतिहासाचा दाखला देत बाबासाहेब आंबेडकर इतके हुशार होते की त्यांनी भारताची फाळणी होण्याअगोदर थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तक लिहिलं. त्यामध्ये दारुल इस्लाम आणि दारुल हरम यावर लिहिलं गेलं दारुल इस्लाम म्हणजे इस्लामचं घर आहे. दारुल हरम म्हणजे युद्धाची भूमी आहे म्हणजे जे जे मुसलमान राष्ट्र आहेत. ते त्यांना इस्लामाचा घर वाटतं आणि जे गैर मुसलमान राष्ट्र आहेत.
ते त्यांना युद्धाचं घर वाटतं म्हणजे भारत हे मुसलमानसाठी युद्धाचे घर आहे असे ते मानतात हे मी म्हणत नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑगस्ट 1947 फाळणी होण्याआधी जे पुस्तक लिहिले त्या पुस्तकात लिहून ठेवले आहे. त्यांना राष्ट्र हे प्रथम नाही त्यांना मुस्लिम हे प्रथम आहे. जगातले मुसलमान जी भूमिका घेतात त्याला भारतात पेक्षा जास्त महत्त्व देतात असेही यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाषणात बोलताना सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.