अमरावती: पोलिस भरती संदर्भातली मोठी बातमी समोर येत आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांची भरती स्थगित झाल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी परतावे लागत आहे. मैदानात पावसाने अचानक लावलेल्या हजेरीमुळे चिखल साचला आहे. भरती प्रक्रियेत अडथळा येत असून भरती स्थगीत करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेची पुढील तारीख लवकरच कळवण्यात येणार आहे. यावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. भरतीप्रकिया ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत ढकलल्या जातील. सप्टेंबरपासून निवडणूकांना सुरुवात होणार त्यामुळे नोव्हेंबर पर्यंत थांबाव लागेल. यातून मार्ग काढून ज्या दिवशी पाऊस नसेल त्या दिवशी भरती घ्यावी अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.