Maharashtra Government Saam TV Marathi
Video

मनोज जरांगेंची मोठी मागणी मान्य, सरकारकडून 9 कोटी 60 लाख रूपयांची मदत, वाचा सविस्तर

Maharashtra Government : मराठा आरक्षण आंदोलनातील २५४ मृतांच्या कुटुंबांना मदत पूर्ण. ९६ मृतांच्या नातेवाईकांना ९ कोटी ६० लाख रुपये वर्ग. याआधी १५८ कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपये दिले गेले होते.

Namdeo Kumbhar

Maharashtra government compensation for Maratha quota agitation deaths : मराठा आंदोलनाबाबत देवेंद्र फडणवीस सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. आंदोलनावेळी मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांना मदत देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनात त्यांनी मृताच्या नातेवाईकांना मदत करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्याबाबत सरकारकडून दोन सप्टेंबर रोजी त्यांना अश्वासन दिले होते. फडणवीस सरकारने आज मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ९ कोटी ६० लाख रुपये वर्ग केले आहेत. सरकारने आंदोलनातील महत्वाची मागणी पूर्ण केली.

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनातील ही एक महत्त्वाची मागणी आता पूर्ण झाली आहे. मराठा आंदोलनात २५४ जणांचा मृत्यू झाला होता. यातील ९६ मृतकांच्या नातेवाईकांना काल ९ कोटी ६० लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. तर याआधी १५८ मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपया प्रमाणे मदत करण्यात आली होती. त्यामुळे आतापर्यंत मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या सर्व नातेवाईकांना अर्थिक मदत पूर्ण करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मावळमध्ये महाविकास आघाडीची घोषणा, पाच पक्ष आले एकत्रित, पण सत्ता मिळेल का?

Wikipedia ला टक्कर देणार 'हे' नवं सॉफ्टवेअर, एलोन मस्कची घोषणा

Online Food Delivery Scam : संतापजनक! ऑनलाई मागवलेल्या अंड्यांमध्ये आढळल्या अळ्या, विरारमध्ये नेमकं काय घडलं?

Navneet Rana: 'तुझ्यावर मुलासमोर बलात्कार करु...'; नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेपर्यंत करता येणार E kyc; उरले फक्त काही दिवस

SCROLL FOR NEXT