खून करणाऱ्या पेक्षा किंवा खंडणी मागणाऱ्या पेक्षा हा सगळा कट रचून आणला, ज्याने हा प्लॅन केला तो महत्वाचा आहे. या सगळ्यांना सरकारमधील कोणाची तरी नक्कीच साथ आहे, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचा इतर ४ आरोपींच्या सोबतचा व्हिडिओ आता समोर आला आहे. केजच्या विष्णु चाटे याच्या कार्यालया बाहेरचा हा सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ आहे. यात हे सर्व आरोपी एकत्र असल्याचं बघायला मिळत आहे. आवादाकडे खंडणी मागायला गेलेल्या दिवसाचाच हा व्हिडिओ आहे. त्यावर मनोज जरांगे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी मोठी आहे. प्रशासन, एसआयटी आणि सीआयडीने या सर्वांना कोणत्या राजकीय नेत्याची साथ आहे का हे आता शोधून काढलं पाहिजे. या आरोपींचा समोर आलेला हा व्हिडिओ म्हणजे खंडणी मागणारे आणि खून करणारे हे सगळे आरोपी एकच आहेत, हेच यातून स्पष्ट होत आहे. हे संपूर्ण प्रकार मूळापासून नष्ट करायचे असतील तर, या प्रकरणातील आरोपींना पळून जाण्यास मदत करणारं नेमकं कोण होतं? खंडणी मागणारे, खून करणारे आणि त्यांना हे करायला लावणारे अशा या तीन टीम आहेत. या तिन्ही टीमला सांभाळणारा सरकार मधला 'तो' नेमका कोण? याचा शोध आता पोलिसांनी लावला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी कोणालाही पाठीशी घालू नये. यातला एक जरी आरोपी सुटला तर तो दहशत पसरवण्यासाठी देशमुख कुटुंबाला जीवितहानी पोहोचवू शकतात, असंही जरांगे यांनी म्हंटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.