केंद्र सरकारने आयुर्वेदिक विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आयुर्वेद शाखेतील अंडरग्रॅज्युएट (UG) अभ्यासक्रमानंतर घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NEXT - National Exit Test) तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे.
विशेष म्हणजे 2019 साली आयुर्वेदच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आता ही परीक्षा द्यावी लागणार नाही. सरकारने स्पष्ट केलं आहे की ही परीक्षा आता 2022 नंतरच्या बॅचसाठी लागू होणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील जवळपास दोन लाख आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी आणि शैक्षणिक संस्थांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून, यामुळे त्यांच्या भविष्याच्या मार्गातला एक मोठा अडथळा दूर झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सरकारकडून या निर्णयाविषयी लवकरच अधिकृत अधिसूचना जारी केली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.