शाळेच्या आवारातील भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी शिक्षकांवर नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. अमरावती महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने हा अजब फतवा काढला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. यावर प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले असून बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना खडेबोल सुनावले आहे. हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा शिक्षणमंत्र्याच्या घरात कुत्रे सोडू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. शिक्षकाने कुत्र्याला सांभाळायचं आणि शिक्षकांनी किती कुत्रे सांभाळले हा पाठपुरावा आमदार करेल त्याचा पाठपुरावा देवा भाऊ करेल असे दिवस महाराष्ट्रात आले याचा आम्ही निषेध करतो. हा निर्णय वापस घेतला नाही तर शिक्षणमंत्र्याच्या घरात कुत्रे सोडू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.