वक्फ कायद्याच्या विरोधात परभणी जिल्ह्यात २७ एप्रिल रोजी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड तर्फे आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनात एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी जोरदार भाषण करत केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडले.
ओवैसी यांनी आपल्या भाषणात वक्फ कायद्याला काळा कायदा असे संबोधून केंद्रातील मोदी सरकारने तो तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली. आज जर तुम्ही बोललात नाही, तर उद्या नुकसान तुमचंच होईल, असे म्हणत त्यांनी वक्फ बोर्डाचे अधिकार कमी करण्याला मुस्लीम विरोधी कट कारस्थान म्हणून हल्ला चढवला.
ओवैसी यांनी मुस्लिम समाजाला एकत्र येण्याचे आवाहन करत म्हटले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे भाऊ एकत्र येऊ शकतात, तर मुस्लिम समाज एकत्र का येऊ शकत नाही? असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.