राज्याच्या राजकारणात येत्या काळात मोठे भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात होती. एकीकडं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा होती. तर दुसरीकडे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. त्यावर शरद पवार यांनी वक्तव्य केलं होतं. यावरून राजकीय वर्तुळातील सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. शरद पवार यांच्या वक्तव्यावर आता अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
आगामी काळात पक्षाला लागलेली गळती थांबवण्यासाठी शरद पवार यांनी तसं वक्तव्य केलं असेल, असं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित नेत्यांना अजित पवार यांनी तसं सांगितलं. सध्याच्या घडीला दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा झाली नाही, असंही स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.