Aditya Thackerey News SaamTv
Video

Mumbai Rain : 'इतकं भयानक चित्र कधीही पाहिलं नव्हतं'; आदित्य ठाकरेंनी सरकारवर ओढले ताशेरे

Aditya Thackerey : तुफान पावसामुळे बुधवारी मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बुधवारी संध्याकाळी विजांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईची दैना उडवली. तुफान पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं होतं.. पाणी साचल्यानं मुंबईकरांचे हाल झाले. सायन, कुर्ला चेंबूरच्या टिळकनगर मध्ये दोन ते तीन फूट पाणी साचले होतं. रात्री 1 वाजेपर्यंत पाणी भरलेलं होत. तर कुर्ला स्टेशन वर बेस्ट बस किंवा रिक्षा नसल्याने चाकरमनी पायी जात असल्याचे दृश्य दिसत होते. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

मुसळधार पावसामुळं मुंबई ठप्प झाली तेव्हा आपातकालीन यंत्रणा कुठे होती? असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी टोळ्यांनी सगळी कंत्राटं वाटून घेतली आहेत असा आरोप केला. काही मिनिटांच्या पावसात मुंबई ठाणे पुणे या शहरांत लोकांचे हाल झाले. मुंबई ठप्प झाली. पहिल्यांदाच वेस्टर्न हायवे तुंबले, बीएमसीची यंत्रणा काल कुठे होती. दोन पालकमंत्री काल कुठे होते. या सरकारचं प्राधान्य खोके आणि पैशांना आहे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी ताशेरे ओढले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

GK: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT