भारत-पाकिस्तान सामना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. हे दोन्ही संघ २ सप्टेंबर रोजी आमने सामने येणार आहेत. हा सामना श्रीलंकेच्या पल्लेकेलेमध्ये रंगणार आहे. आशिया चषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने नेपाळ संघावर २३८ धावांनी विजय मिळवला होता.
या विजयामुळे पाकिस्तानचा आत्मविश्वास उंचावलेला असणार असणार आहे. तप भारताचा संघ देखील हा सामना जिंकून विजयी सलामी देण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
पावसामुळे सामना होणार रद्द?
या सामन्यात पाऊस अडथळा निर्माण करणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत. वेदर डॉट कॉमच्या अहवालानूसार भारत- पाकिस्तान सामन्याच्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता ही ८० टक्के इतकी असणार आहे.
तर दिवसाचे तापमान २६ डिग्रीच्या आसपास असेल.तसेच १० ते १५ किमी प्रतीतास वेगाने वारे वाहतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावरुन हे स्पष्ट आहे की, या सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानूसार लागू शकतो.
जर वनडे सामन्याचा निकाल लावायचा असेल तर कमीत कमी २०-२० षटकांचा सामना होणं गरजेचं आहे. हा सामना दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. तर संध्याकाळी ५:३० वाजता पाऊस पडण्याती शक्यता ६० टक्के इतकी असणार आहे. (Latest sports updates)
सामना रद्द झाल्यास काय?
जर हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला तर, याचा पाकिस्तानला फायदा होणार आहे. कारण पाकिस्तानने पहिला सामना जिंकला आहे.त्यामुळे जर पाकिस्तानने हा सामना जिंकला तर पाकिस्तानचा संघ ३ गुणांसह सुपर-४ साठी पात्र ठरेल.
तर भारतीय संघाला शेवटचा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला तर हे दोन्ही संघ १३२ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान पाकिस्तानने ७३ तर भारतय संघाला केवळ ५५ सामने जिंकता आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.