australia and srilanka cricket team twitter
Sports

T-20 World Cup 2024: श्रीलंकेचा खेळ पावसानं बिघडवला! सामना रद्द होताच स्पर्धेतून बाहेर तर AUS ची सुपर ८ मध्ये एन्ट्री

T-20 World Cup 2024 Super 8: श्रीलंका आणि नेपाळ यांच्यात होणारा सामना हा पावसामुळे रद्द झाला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. सर्व संघांचं लक्ष सुपर ८ मध्ये पोहचण्यावर असणार आहे. दक्षिण आफ्रिकेने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. तर श्रीलंकेचा संघ स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिलाच संघ ठरला आहे. श्रीलंकेने आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. यापैकी २ सामन्यांमध्ये श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर १ सामना पावसामुळे रद्द झाला.

श्रीलंकेचा ड गटात समावेश करण्यात आला आहे. श्रीलंकेचा पुढील सामना नेपाळविरुद्ध होणार होता. मात्र या सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. सामना रद्द झाल्याचा दक्षिण आफ्रिकेला मोठा फायदा झाला आहे. तर श्रीलंकेच्या टेन्शनमध्ये भर पडली आहे. कारण श्रीलंकेचा १ सामना शिल्लक आहे. हा सामना कितीही मोठ्या फरकाने जिंकला तरीदेखील हा संघ सुपर ८ मध्ये प्रवेश करू शकणार नाही.

श्रीलंकेने पुढील सामना जिंकला तरी हा संघ ३ गुणांपर्यंत पोहोचेल. बांगलादेश विरुद्ध नेदरलँड यांच्यातील सामना झाल्यानंतर श्रीलंकेचा संघ अधिकृतरित्या स्पर्धेतून बाहेर पडेल. श्रीलंकेला अजूनही सुपर ८ मध्ये जाण्याची संधी मिळू शकते. मात्र त्यासाठी दक्षिण आफ्रिका सोडून इतर कुठलाच संघ ३ गुणांचा पुढं जायला नको. यासह बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यात होणारा सामनाही पावसामुळे रद्द झाला पाहिजे.

यासह ब गटातून ओमानचा संघही बाहेर पडला आहे. ओमानने ३ सामने गमावले आहेत. येणाऱ्या काही सामन्यांमध्ये लवकरच सुपर ८ चं चित्र स्पष्ट होईल. भारतीय संघाकडे अमेरिकेला पराभूत करून सुपर ८ मध्ये जाण्याची संधी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Jyoti Chandekar: 'तू फसवलंस आजी...'; पूर्णा आजीला निरोप देताना 'ठरलं तर मग' परिवाराचे अश्रू अनावर

GK: स्मशानभूमीतून घरी परतल्यानंतर आपण आंघोळ का करतो?

Parali News : पुराच्या पाण्यात कार गेली वाहून; तिघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू

Mumbai School Bus : माणुसकी! मुंबईला पावसाचा तडाखा, स्कूल बस अडकली पाण्यात, धो धो पावसात पोलिसांनी मुलांना वाचवले

SCROLL FOR NEXT