संजय मांजरेकरने केली रविंद्र जडेजाच्या खेळावर टीका Saam Tv
Sports

संजय मांजरेकरने केली रविंद्र जडेजाच्या खेळावर टीका

दोन फिरकी गोलंदाज संघात खेळवणे हा चर्चेचा विषय ठरला होता. जेव्हा पाऊसामुळे खेळ एक दिवस लांबला तेव्हा तरी हा निर्णय बदलायला हवा होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) म्हणाला की, ''रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Finals) प्लेइंग इलेव्हनमध्ये अर्थात न्यूझीलंडविरुद्धच्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये त्याच्या फलंदाजीमुळे समावेश केला होता. परंतु तो विषेश काही करु शकला नाही. जडेजाच्या जागी हनुमा विहारीसारख्या तज्ज्ञ फलंदाजांने भारताला आणखी काही धावा जोडण्यास मदत केली असती''.

ऐतिहासिक सामन्यात 31 धावा (पहिल्या डावात 15 आणि दुसऱ्या डावात 16) करणाऱ्या जडेजाला डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून निवडला गेला नव्हते असे मांजरेकर म्हणाला. एका माध्यमाशी बोलताना मांजरेकर म्हणाला, "खेळ सुरू होण्यापूर्वीच भारताचा निर्णय कसा चुकला हे लक्षात घेण्यासारखे आहे. दोन फिरकी गोलंदाज संघात खेळवणे हा चर्चेचा विषय ठरला होता. जेव्हा पाऊसामुळे खेळ एक दिवस लांबला तेव्हा तरी हा निर्णय बदलायला हवा होता''.

संजय पुढे म्हणाला ''संघाची फलंदाजी मजबूत करण्यासाठी जडेजाला निवडले होते. तसेच तो डावखूऱा फिरकी गोलंदाज आहे म्हणून निवडले गेले होते. परंतु, त्याला डावखूरा फलंदाज म्हणून निवडणे याच्या कायमच मी विरोधात आहे. संघामध्ये परिस्थीती नुसार बदल करावे लागतात. जडेजाला फलंदाज म्हणून निवडणे भारतीय संघाला महागात पडले आहे''.

Edited By : Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT