IND vs PAK: सामन्यात कोणते गोलंदाज खेळतील? रवी शास्त्रींनी दिले उत्तर
IND vs PAK: सामन्यात कोणते गोलंदाज खेळतील? रवी शास्त्रींनी दिले उत्तर  Twitter
क्रीडा | IPL

IND vs PAK: सामन्यात कोणते गोलंदाज खेळणार? रवी शास्त्रींनी दिले उत्तर

वृत्तसंस्था

भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shashtri) यांनी सोमवारी (18 ऑक्टोबर) टी -20 विश्वचषक (T-20 World Cup) स्पर्धेत भारताच्या गोलंदाजी आक्रमणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, संघ पाकिस्तानविरुद्ध 24 ऑक्टोबरला अतिरिक्त वेगवान गोलंदाज किंवा फिरकीपटूसह खेळणार आहे, हे परिस्थिती बघून ठरवले जाईल. सराव सामन्यांच्या दरम्यान गोलंदाजांची चाचणी घेऊ, असेही शास्त्री यांनी स्पष्ट केले आहे. भारताने सोमवारी सराव सामन्यात इंग्लंडचा पराभव केला. आता 20 ऑक्टोबरला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे.

शास्त्रींनी भारताचे माजी यष्टीरक्षक दीप दासगुप्ता यांच्याशी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, “खेळपट्टीवर किती ड्यू आहे हे पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानुसार प्रथम फलंदाजी/गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ. अतिरिक्त फिरकीपटू किंवा वेगवान गोलंदाजांबाबत निर्णय घेण्यास आम्हाला फायदा होईल''.

शास्त्री म्हणाले की, आयपीएलमुळे भारतीय खेळाडूंना तयारीमध्ये खूप मदत झाली आहे. विशेषतः ते खेळाडू जे नियमितपणे आपापल्या संघांसाठी खेळतात. शास्त्री म्हणाले, खेळाडू गेल्या दोन महिन्यांपासून आयपीएल खेळत आहेत, त्यामुळे त्यांना जास्त तयारीची गरज आहे असे मला वाटत नाही.

सराव सामन्यांच्या फायद्यांविषयी विचारले असता शास्त्री म्हणाले, "प्रत्येकजण कशी फलंदाजी करु शकतो, कशी गोलंदाजी करू शकतो. याची कल्पना येण्यास आम्हाला मदत होईल". केएल राहुल आणि इशान किशन यांनी आकर्षक अर्धशतके झळकावत संघाला सोमवारी टी -२० विश्वचषकाच्या पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडवर सात गडी राखून विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर इंग्लंडने पाच बाद 188 धावा केल्या, जॉनी बेअरस्टो (36 चेंडूत 49) आणि मोईन अली (20 चेंडूत नाबाद 43) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारताकडून मोहम्मद शमीने 40 धावा देऊन तीन बळी घेतले.

राहुलने 24 चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या, तर इशानने 46 चेंडूत 70 धावा केल्या ज्यामध्ये सात चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 50 चेंडूत 82 धावा जोडल्या. शेवटी, ऋषभ पंत (14 चेंडूत नाबाद 29) आणि हार्दिक पांड्या (10 चेंडूत नाबाद 16) यांनी संघाची धावसंख्या 19 षटकांत 3 बाद 192 वर नेली होती.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT