BCCI ने IPL 2022 चा समारोप समारंभ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. एका रिपोर्टनुसार, बॉलीवूड स्टार रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि संगीतकार एआर रहमान या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान बीसीसीआय भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे अनोख्या पद्धतीने साजरे करणार आहे.
आयपीएलचा (IPL 2022) समारोप सोहळा अहमदाबादमध्ये यंदाच्या हंगामाच्या अंतिम सामन्यापूर्वी होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, समारोप समारंभ एकूण ४५ मिनिटांचा असणार आहे. BCCI ने समारोप समारंभाचे आयोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी एक एजन्सी नियुक्त केली आहे. एआर रहमान आणि रणवीर सिंग हे कलाकार समारोप कार्यक्रमात परफॉर्म करताना दिसणार आहेत. बीसीसीआय भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करणार आहे त्याचबरोबर भारतीय क्रिकेटचा प्रवासही दाखवेल.
BCCI भारतीय क्रिकेट संघाच्या सर्व माजी कर्णधारांना समारोप समारंभासाठी आमंत्रित करण्याची योजना आखत आहे. स्वातंत्र्याच्या सुमारे ७५ वर्षे आणि गेल्या ७ दशकांमध्ये भारतीय क्रिकेटचा कसा विकास झाला, ही या कार्यक्रमाची संपूर्ण थीम असणार आहे.
टाटा इंडियन प्रीमियर लीग प्लेऑफ आणि फायनल 24 मे ते 29 मे 2022 या कालावधीत कोलकाता आणि अहमदाबाद येथे खेळली जाणार आहे. पहिला क्वालिफायर 24 मे आणि 25 मे रोजी एलिमिनेटर कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 27 आणि 29 मे रोजी अनुक्रमे क्वालिफायर 2 आणि टाटा आयपीएलची फायनल होणार आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.