mumbai indians  saam tv
Sports

IPL 2025: मुंबई इंडियन्स कोणत्या २ खेळाडूंना नारळ देणार? ६ पैकी ४ जण निवडण्याचा पेच

Mumbai Indians Retain Players In IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघ कोणत्या ४ खेळाडूंना रिटेन करु शकतो? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही महिने शिल्लक राहिलेत. या स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. मेगा ऑक्शन दर चार वर्षांनी होतं. मेगा ऑक्शनमध्ये बरेच स्टार खेळाडू इकडून तिकडे होत असतात.

यावेळीही मेगा ऑक्शनमध्ये असंच काहीसं चित्र पाहायला मिळू शकतं. इतर संघांच्या तुलनेत मुंबई इंडियन्सचं टेन्शन जरा जास्तच वाढणार आहे. कारण या संघात एकापेक्षा एक स्टार खेळाडू आहेत. त्यापैकी ४ खेळाडूंची निवड करणं हे डोंगर कोपरुन काढण्यासारखं आहे.

कोणाला ठेवायचं कोणाला काढायचं?

मेगा ऑक्शनमध्ये आतापर्यंत तरी ४ खेळाडूंना रिटेन करण्याची अनुमती दिली गेली आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआय आणि आयपीएलचे संघमालक यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत ६ खेळाडूंना रिटेन करण्याची अनुमती देण्यात यावी, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. याबाबत कुठलाही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

माध्यमातील वृत्तानुसार, मुंबई इंडियन्स रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंना रिटेन करु शकते. हे चारही असे खेळाडू आहेत, जे लिलावात आले तर रेकॉर्डब्रेक बोली लागू शकते.

त्यामुळे मुंबई इंडियन्स या चौघांनाही कुठल्याही अटीवर सोडण्याचा निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे इशान किशन, तिलक वर्मा, डेवाल्ड ब्रेविससारख्या स्टार खेळाडूंना रिलीज करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाची साथ सोडणार?

रोहित शर्मा गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधित्व करतोय. रिकी पॉंटींगला कर्णधारपदावरुन काढल्यानंतर ही जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्यात आली होती. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्स संघाने ५ वेळेस आयपीएलची ट्रॉफी उंचावली.

दरम्यान रोहितला काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली होती. त्यामुळे फॅन्स नाराज झाल्याचे पाहायला मिळाले होते. आगामी हंगामापूर्वी अशी चर्चा सुरु आहे की, रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाची साथ सोडू शकतो. मात्र रोहित मुंबई इंडियन्स संघाची साथ सोडण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण रोहितला मुंबईने वेगळी ओळख दिली आहे. मुंबईकरांचा रोहितला फुल सपोर्ट आहे. असं असताना रोहित मुंबई सोडून जाण्याचा निर्णय घेणं कठीण आहे.

कोण होणार कर्णधार?

आयपीएल २०२४ स्पर्धेत रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्स संघाला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. तसंच हार्दिक पंड्याला मुंबईचा कर्णधार बनवनं हे फॅन्सला पटलंच नव्हतं. आता कर्णधारपदासाठी सूर्यकुमार यादवदेखील प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे जर मुंबई इंडियन्सला कर्णधार बदलायचा असेल, तर ते ही जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवली जाऊ शकते.

गेल्या हंगामात असा होता मुंबई इंडियन्स संघ:

रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, एन. तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, निहाल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरनडॉर्फ, रोमॅरियो शेपर्ड, हार्दिक पंड्या.

या ४ खेळाडूंना केलं जाऊ शकतं रिटेन:

रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT