भारतीय संघ सेमी फायनलच्या दिशेने आगेकूच करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाचा सुपर ८ फेरीतील दुसरा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे.
हा सामना अँटिग्वाच्या मैदानावर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरु होईल.
यापूर्वी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानचा धुव्वा उडवला होता. बाराबाडोसमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ४७ धावांनी बाजी मारली होती.
भारतीय संघात ३ असे खेळाडू आहेत, जे बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात.
भारतीय संघाने अफगाणिस्तानला पराभूत करत सेमीफायनलच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. आता सलग दुसरा सामना जिंकून भारतीय संघाचं सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म होईल.
सूर्याची फलंदाजी
सूर्यकुमार यादवने गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये अर्डशतकी खेळी केली आहे. या सामन्यातही त्याची बॅट तळपली तर बांगलादेश संघाचं काही खरं नाही. तो आपल्या ३६० स्टाईल फलंदाजीसाठी ओळखला जातो .
रिषभ पंत
सलामी जोडी फ्लॉप झाल्यानंतर रिषभ पंतने फलंदाजीला येऊन भारतीय संघाचा डाव सांभाळला आहे. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध २० आणि पाकिस्तानविरुद्ध ४२ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती.
कुलदीप यादव
कुलदीप यादवची भूमिका अतिशय महत्वाची असणार आहे. तो फिरणाऱ्या चेंडूवर बांगलादेशच्या फलंदाजांना नाचवू शकतो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.