Virat Kohli News, Team India News updates Saam Tv
Sports

टीम इंडियाला मोठा झटका! विराट कोहलीला कोरोनाची लागण

मालदीवमधून परतल्यानंतरच विराट कोहलीला कोरोना झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

वृत्तसंस्था

मुंबई - महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषाणूचा फटका सर्वसामांन्यांपासून, बॉलिवूड कलाकार, मालिका विश्वातील अभिनेते-अभिनेत्री तसेच बड्या नेत्यांना देखील बसला आहे. त्यातच आता विराट कोहलीला (Virat Kohli) कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. मालदीवमधून परतल्यानंतरच विराट कोहलीला कोरोना झाला असल्याची माहिती समोर येत आहे. (Team India News updates)

हे देखील पाहा -

भारतीय क्रिकेट टीमला इंग्लंड दौऱ्यावर एकमेव टेस्ट सामना खेळायचा आहे, मात्र त्याआधी विराट कोहलीला कोरोना झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी 1 जुलैपासून सुरू होणार असून ती 5 जुलैपर्यंत खेळवली जाणार आहे. पण, विराट कोहलीच्या कोरोना रिपोर्टने चाहत्यांची चिंता वाढवली आहे.

रविचंद्रन अश्विननंतर आता विराट कोहलीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आता अशा परिस्थितीत आणखी खेळाडूंना कोरोना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारत आणि इंग्लंड पुढील महिन्यात बर्मिंगहॅम येथे होणार्‍या एकमेव कसोटीत आमनेसामने येणार आहेत. याआधी भारतीय संघ 24 जूनपासून लीसेस्टर काउंटी संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. मात्र, अश्विन, विराटची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने चाहत्यांची चिंता वाढवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरमध्ये श्रीफळ आकाशात फेकण्याची अनोखी यात्रा

महापालिकेत नमाज पठण, नमाज पठणानंतर हिंदुत्ववादी आक्रमक

Thursday Horoscope : धनलाभ होईल, लक्ष्मी प्रसन्न होईल; ५ राशींच्या लोकांवर पैशांचा पाऊस पडणार

Rajya Sabha: मोठी बातमी! राज्यसभेसाठी मुंडे यांचे नाव चर्चेत; ऐनवेळी भाजपच्या गोटात बदलाचे वारे,पडद्यामागे घडतंय काय?

अन्न आणि औषध विभागातील कारभार पुन्हा चर्चेत; CM फडणवीसांच्या दरबारात पोहोचली तक्रार

SCROLL FOR NEXT