आशिया चषकातील सुपर ४ चा सामना पाकिस्तान संघाविरूद्ध सुरु आहे. हा सामना रविवारी खेळवला जाणार होता. मात्र या दिवशी पावसाचे आगमन झाल्याने हा सामना पूर्ण होऊ शकला नव्हता. त्यामुळे हा सामना राखीव दिवशी म्हणजे आज खेळवला जाणार आहे.
भारतीय संघाने पहिल्या दिवशी २४.१ षटकअखेर १४७ धावा केल्या होत्या. जर राखीव दिवशीही या सामन्याचा निकाल लागू शकला नाही,तर भारतीय संघाचं अंतिम फेरीत पोहोचणं कठीण आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कोलंबोच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यानंतर सुपर ४ चे इतर सामने आणि आशिया चषकाचा अंतिम सामना देखील याच मैदानावर रंगणार आहे.
क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी अशी की, येत्या आठवडाभर कोलंबोत पाऊस पडण्याची शक्यता ही ६० ते ८० टक्के इतकी असणार आहे. याचा अर्थ असा की, सुपर ४ फेरीतील इतर सामने देखील पावसामुळे धुतले जाऊ शकतात.
जर सुपर ४ फेरीतील इतर सामनेही रद्द झाले तर भारताचा संघ अंतिम फेरीत जाऊ शकणार नाही. कसं असेल समीकरण थोडक्यात समजून घ्या. (Latest sports updates)
सुपर ४ फेरीत एकुण ६ सामने खेळवले जाणार आहेत. आतापर्यंत २ सामने झाले आहेत. ज्यात पाकिस्तान आणि श्रीलंकेने बांगलादेशचा पराभव केला आहे. तसं पाहायला गेलं तर बांगलादेशचा संघ अंतिम फेरीत जाण्याच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.
पाकिस्तान, श्रीलंका आणि भारत या तिन्ही संघांमध्ये अंतिम फेरीत जाण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. जर स्पर्धेतील पुढील सामने पावसामुळे रद्द झाले तर याचा फायदा पाकिस्तान आणि श्रीलंकेला होणार आहे.
कारण दोन्ही संघांनी आतापर्यंत २-२ गुणांची कमाई केली आहे. जर सर्व सामने रद्द झाले तर भारतीय संघ जास्तीत जास्त ३ गुणांपर्यंत पोहचू शकतो. तर पाकिस्तान आणि श्रीलंकेचा संघ ४-४ गुणांसह अंतिम फेरीत प्रवेश करेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.