रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत क्रिकेट विश्वात वावड्या उठल्या असतानाच, वेस्ट इंडिजविरुद्ध २७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वनडे आणि टी २० मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. अजित आगरकरच्या नेतृत्वात निवड समितीनं बुधवारी संघ जाहीर केला. भारताच्या वनडे संघात स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचाही समावेश करण्यात आला आहे. तर अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याचंही पुनरागमन झालं आहे. आकिब नबी आणि नमन धीर या दोघांना पहिल्यांदाच वनडे संघात स्थान देण्यात आलं आहे. मात्र, ऋषभ पंतला संधी मिळू शकली नाही. विशेष म्हणजे यावेळी ईरानी कपसाठी रेस्ट ऑफ इंडिया चमूचीही घोषणा करण्यात आली आहे. त्याचं नेतृत्व पंतकडे देण्यात आले आहे.
शुभमन गिल - कर्णधार, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल - उपकर्णधार, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर बरार, मोहम्मद सिराज, औकिब नबी, यशस्वी जयस्वाल, नमन धीर.
श्रेयस अय्यर - कर्णधार, तिलक वर्मा - उपकर्णधार, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, वैभव सूर्यवंशी, शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयंक यादव.
पहिला वनडे सामना हा २७ सप्टेंबरला दुपारी २ वाजता सुरू होईल. तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येईल. तर दुसरा वनडे सामना ३० सप्टेंबरला दुपारी २ वाजता गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये होईल. तिसरा वनडे सामना हा मुल्लांपूरच्या महाराजा यादवेंद्र सिंह इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये ३ ऑक्टोबरला दुपारी २ वाजता सुरू होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.