IND vs ENG Twitter/ @BCCI
Sports

IND vs ENG: मालिकेचा निकाल लागला; 'या' दिवशी होणार पाचवा सामना

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात मँचेस्टरमध्ये होणाऱ्या पाचव्या कसोटीबाबात (Fifth Test Match) मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

वृत्तसंस्था

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात मँचेस्टरमध्ये होणाऱ्या पाचव्या कसोटीबाबात (Fifth Test Match) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुढे ढकलण्यात आलेल्या मालिकेतील विजेत्याचा निर्णय पुढील वर्षी घेतला जाणार आहे. भारतीय संघ (Team India) पुढच्या वर्षी 2022 मध्ये तीन टी- 20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. आणि आता हे निश्चित झाले आले आहे की या दौऱ्यावर भारतीय संघ अतिरिक्त कसोटी सामना देखील खेळेणार आहे, जो सध्याच्या मालिकेचा भाग असेल आणि आताच्या मालिकेचा निकाल काय असेल हे तेव्हा ठरवले जाईल. एवढेच नाही तर भारतीय संघ या दौऱ्यावर अतिरिक्त टी -20 सामनाही खेळू शकतो.

अर्थात या दौऱ्यावर हा एकमेव कसोटी सामना असणार आहे, परंतु ही कसोटी मालिका मानली जाणार नाही. तोपर्यंत या मालिकेत भारताचा 2-1 पुढे राहणार आहे पाचवा सामना झाला की या मालिकेचा अंतीम निकाल लागणार आहे. जर भारताने पाचवा कसोटी सामना जिंकला तर भारत 3-1 ने मालिकेचा विजेता मानला जाईल आणि इंग्लंडने जर ती कसोटी मालिका जिंकली तर मालिका 2-2 अशी बरोबरी सुटेल. जर कसोटी सामना अनिर्णित राहिला तर भारताला 2-1 ने विजेता घोषित केले जाईल.

असे मानले जाते की पाचवा कसोटी सामना न होण्याने ईसीबीला सुमारे 407 कोटी रुपये नुकसान झाले आहे. यातील broadcastसाठी सुमारे 307 कोटी रुपये तर सुमारे 101 कोटी रुपये तिकीट विक्रीतून नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत, ईसीबीच्या या नुकसानीची भरपाई करण्यासाठी अतिरिक्त सामने खेळून बीसीसीआय मदत करण्यास तयार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्थानिक भाजपला शिंदेसेना नको, भाजपचे मंडळाध्यक्ष इरेला पेटले

नागपुरात पाण्याच्या टाकीचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू, दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

SCROLL FOR NEXT