यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि सरफराज खान यांच्या चमकदार कामगिरीनंतर भारतानं तिसऱ्या कसोटी सामन्यात मोठा विजय मिळवला. भारताने गोलंदाजांच्या जोरावर इंग्लंडचा ४३४ धावांनी पराभव केलाय. कसोटी क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत टीम इंडियाचा हा सर्वात मोठा विजय आहे. भारताने दिलेल्या ५५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला इंग्लंडचा संघ १२२ धावांवर गडगडला. या सामन्यात रविंद्र जडेजाने मोठा विक्रम केलाय.
बेन स्टोक्सला बाद करून जडेजाने भारतीय भूमीवर कसोटी क्रिकेटमधील २०० बळी पूर्ण केले.जडेजाच्या आधी अनिल कुंबळेने कसोटी ३५०, रविचंद्रन अश्विन ३४७, हरजभ सिंह २६५ आणि कपिल देवने २१९ विकेट घेतल्या आहेत. जडेजाने आतापर्यंत ७० कसोटी सामन्यात २८२ विकेट घेतल्या आहेत. यात २०१ विकेट त्याने भारतातील मैदानात घेतल्या आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.