DC vs KKR: दिल्ली बदला घेणार? 9 वर्षापुर्वी प्लेऑफमध्ये आले होते आमने-सामने Twitter
Sports

DC vs KKR: दिल्ली बदला घेणार? 9 वर्षापुर्वी प्लेऑफमध्ये आले होते आमने-सामने

9 वर्षापुर्वी कोलकाताने दिल्लीच्या संघाला प्लेऑफ मध्ये पराभूत केले होते.

वृत्तसंस्था

आयपीएल 2021 (IPL 2021) आता अंतिम टप्प्यात आहे. दोन सामने बाकी आहेत. महेंद्रसिंग धोनी, ऋषभ पंत आणि इऑन मॉर्गन यांच्यापैकी ट्रॉफी कोण घेणार हे 15 ऑक्टोबर रोजी कळणार आहे. त्याआधी, दुसऱ्या पात्रता फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. या सामन्यात दिल्लीचा संघ बदला घेण्याच्या भावनेने उतणार आहे. 9 वर्षापुर्वी कोलकाताने दिल्लीच्या संघाला प्लेऑफ मध्ये पराभूत केले होते. या हंगामातील एलिमिनेटर सामन्यात कोलकाताच्या संघाने मजबूत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला आहे. दुसरीकडे, गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला क्वालिफायर 1 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. दोन्ही संघांना विजय मिळवून अंतीम सामना खेळायचा आहे.

कोलकाता आणि दिल्लीचा (KKR vs DC) संघ 9 वर्षांनंतर प्लेऑफमध्ये (Play-off) आमनेसामने येणार आहे. शेवटच्या वेळी विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) दिल्लीचा कर्णधार होता. त्याचवेळी कोलकाताचा कर्णधार होता गौतम गंभीर (Gautam Gambhir). आता दोघेही खेळाडू निवृत्त झाले आहेत. त्यावेळी कोलकाताने दिल्लीच्या संघाला पराभूत केले होते. दिल्लीच्या संघाने आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी मजबूत आहे. त्यामुळे दिल्लीच्या संघाचे पारडे जड आहे.

दरम्यान, कोलकाताचा संघ अतीशय संघर्ष करुन प्लेऑफ मध्ये पोहोचला आहे. मागच्या सामन्यात सुनील नारायनने अतीशय चांगली खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. सुनील नारायन ने ४ बळी घेवून चांगली फलंदाजी करुन संघाला विजय मिळवून दिला होता. कोलकाताच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये बायोगॅसची टाकी स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू

Face Care: उन्हाळ्यातही तुमचा चेहरा करेल नॅचरल ग्लो; फक्त 'या' फळांचा तुमच्या आहारात करा समावेश

कल्याणमध्ये देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे स्मारक होणार; वास्तूजवळ कोणकोणत्या सुविधा असणार?

UGC कडे तक्रार अन् आयुर्वेद कॉलेजमधील 18 विद्यार्थ्यांचं निलंबन; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra HSC Result: १२ वीचा निकाल 'Coming Soon'; रिझल्टबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT