सरकारनामा

VIDEO | शिवसेनेसोबत जाण्यास आघाडीची तत्वतः मंजुरी

सकाळ न्यूज नेटवर्क

महारष्ट्रात गेल्या 21 दिवसापासून सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. अशातच महाराष्ट्रात पर्यायी सरकार देण्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमध्ये तब्बल तीन तास चर्चा सुरु होती. यानंतर दोन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांनी माध्यमांना आजच्या बैठकीबद्दल माहिती दिली. 

राष्ट्रपती राजवट लागल्यापासून महाराष्ट्रातील शेतकरी आणि जनतेकडे दुर्लक्ष होतंय अशी भावना नवाब मलिक यांनी मांडली. अशात आज झालेली चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असं कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि प्रवक्ते पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांना दिली. अशातच चर्चांचं सत्र आणखी काही दिवस सुरु राहणार आहे.

येत्या काही दिवसात महाराष्ट्राला पर्यायी सरकारच्या माध्यमातून शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून सरकार स्थापन झालेलं दिसेल असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

महाशिवआघाडीला काँग्रेस हायकमांड सोनिया गांधींनी हिरवा कंदील दिल्यानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी प्रदीर्घ अशी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. यामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार , नवाब मलिक, जयंत पाटील यांच्यासोबत कॉंग्रेसचे मोठे नेते जयराम रमेश, के सी वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल यांच्यासोबत सर्व महत्व्वाचे नेते उपस्थित होते. 

पेढ्यांची ऑर्डर गेलीये असं समजा

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा पेच येत्या काही दिवसात सुटताना पाहायला मिळणार आहे. यातच  "लवकरच उद्धव ठाकरे गोड बातमी महाराष्ट्राला देतील, त्यामुळे पेढ्यांची ऑर्डर गेलीये असं समजा" असं अत्यंत सूचक विधान शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यानी केलंय. दिल्लीत राऊत यांनी माध्यमांसमोर तसं मत मांडलंय.  त्यामुळे लवकरच आता महाशिवआघाडीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन होणार असं म्हटलं तर वावगं ठरू नये. 

WebTitle : congress and ncp meeting over what happened in this meeting

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Constituency: हे चार विधानसभा मतदारसंघ संवेदनशील जाहीर करा; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची मागणी

Nashik Loksabha: मनधरणी निष्फळ! शांतीगिरी महाराज अपक्ष लढण्यावर ठाम; नाशिकमध्ये महायुतीची वाट बिकट?

ICICI Bank : NRI ग्राहकांसाठी ICICI बँकेचा महत्वपूर्ण निर्णय; परदेशातील मोबाईल नंबरवरून भारतात करता येणार UPI पेमेंट

सोनाक्षी सिन्हाच्या 'हिरामंडी'ची चाहत्यांना भुरळ, अभिनयाची होतेय चर्चा

Today's Marathi News Live : मुंबईतील खार दांडा परिसरात शिवसेना भाजपा कार्यकर्ते आमने-सामने

SCROLL FOR NEXT