Shardiy Navratra 2022 Saam Tv
धार्मिक

Navratri 2022 : नवरात्रीत जवाची पेरणी का केली जाते? धार्मिक महत्त्व आणि कारणे जाणून घ्या

नवरात्रीत कलश आणि ज्वारी म्हणजेच जवाच्या घटस्थापनेला खूप महत्त्व आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shardiy Navratri 2022 : हिंदू धर्मात नवरात्रीच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यावर्षी शारदीय नवरात्रीची (Navratra) सुरुवात २६ सप्टेंबर २०२२ पासून होत आहे. नवरात्रीमध्ये देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा विधीनुसार केली जाते आणि उपवास केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये लोक आपल्या घरात अखंड ज्योत लावतात. यासोबतच माता राणीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीत कलश आणि ज्वारी म्हणजेच जवाच्या घटस्थापनेला खूप महत्त्व आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना म्हणजेच कलशाच्या स्थापनेसोबत जवाची पेरणी (Sowing) केली जाते. याशिवाय आई अंबेची पूजा अपूर्ण राहते, असे म्हणतात. कलशाची स्थापना करून जव पेरण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. अशा परिस्थितीत आज जाणून घेऊया नवरात्रीत जवाची पेरणी का केली जाते आणि त्यामागे कोणती धार्मिक श्रद्धा आहे.

जवाची पेरणी का केली जाते ?

जव हे ब्रह्मदेवाचे प्रतीक मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, ब्रह्माजींनी जेव्हा हे विश्व निर्माण केले, तेव्हा वनस्पतीमध्ये पहिले पीक आले ते 'जव'. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या वेळी प्रथम जवाची पूजा केली जाते आणि ती कलशातही स्थापित केली जाते.

जव हे विश्वाचे पहिले पीक मानले जाते, म्हणून जेव्हा जेव्हा देव-देवतांची पूजा केली जाते किंवा हवन केले जाते तेव्हा फक्त जव अर्पण केला जातो. जव हे अन्नासारखे आहे, म्हणजे ब्रह्म आणि अन्न यांचा नेहमी आदर केला पाहिजे, असेही म्हटले जाते. म्हणूनच पूजेत बार्लीचा वापर केला जातो.

यावरून नवरात्रीत जव पेरल्याचे सूचित होते -

नवरात्रीत कलश स्थापनेदरम्यान पेरलेली जव दोन-तीन दिवसांत उगवते, पण ती उगवली नाही तर भविष्यात ते शुभ लक्षण नाही. दोन-तीन दिवसांनंतरही त्यांना अंकुर फुटला नाही, तर मेहनत केल्यावरच फळ मिळेल, असा समज आहे.

याशिवाय जर जव वाढले असेल पण त्याचा रंग खालून अर्धा पिवळा आणि वरून अर्धा हिरवा असेल तर याचा अर्थ येत्या वर्षाचा अर्धा काळ ठीक असेल, पण नंतर समस्यांना तोंड द्यावे लागेल. दुसरीकडे, जर पेरलेली जव हे पांढऱ्या किंवा हिरव्या रंगात वाढत असेल तर ते खूप शुभ मानले जाते. म्हणजे केलेली उपासना सफल झाली आहे. येणारे वर्ष खूप आनंदाचे असेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT