Climate change, crop roots
Climate change, crop roots 
बातमी मागची बातमी

तापमान वाढीचा शेतीवर गंभीर परिणाम ज्वारी, बाजरी, ऊस, कांद्याचं उत्पादन घटणार

साम टीव्ही

हवामान बदलाचा परिणाम जसा मानवी जीवनावर होतोय, तसाच तो पिकांवरही होतोय.त्यामुळे येत्या काही वर्षात नगदी पिकांचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

सध्या राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, कुठे गारपीट.तर कुठे असह्य होणारा उन्हाळा असं चित्र आहे हवामानातील हे बदल पिकांच्या मुळावरही उठलेत.त्यामुळे या बदलांचा विपरीत परिणाम होऊन ज्वारी, बाजरी, तसंच ऊस, गहू, आणि तांदूळ या पिकांचं उत्पादन घटणार आहे.

स्विझर्लंडमधील एका मासिकात प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार संपूर्ण महाराष्ट्राच्या तापमानात २०५० पर्यंत ०.५ ते २.५ अंश सेल्सियसची वार्षिक सरासरी वाढ होणं अपेक्षित आहे. २०३३ नंतर तापमानातील ही वाढ प्रकर्षाने होणार आहे. विशेष म्हणजे कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या तापमानात काही भागांत १ ते २.५ अंश सेल्सिअस इतकी  लक्षणीय वाढ होणार आहे.

हे संशोधन म्हणजे भविष्यात येणाऱ्या मोठ्या संकटाचा इशारा आहे यातून धडा घेऊन योग्य खबरदारी घेतली गेली नाही तर मानवाच्या अस्तित्वावरच संकट येईल. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping Promblem: रात्री चांगली झोप लागत नाही, आहारात करा बदल

Lok Sabha Election: नवी मुंबईत भाजपमध्ये फूट?, मंदा म्हात्रे यांचं मोठं वक्तव्य

Health Tips: तुम्हाला वारंवार पोटाचे विकार होतात का? आहारात 'या' गोष्टीचा करा समावेश

Maharashtra Politics 2024 : ...म्हणून नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांना फोन करायचे: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्या घटनेमागचं सत्य

Vivo V30e 5G भारतात लॉन्च; 50MP फ्रंट कॅमेऱ्यासह मोबाईलमध्ये आहेत अनोखे फीचर्स, जाणून घ्या किंमत

SCROLL FOR NEXT