Mumbai concrete forest 
बातमी मागची बातमी

मुंबई बनलं कॅाक्रीटचं जंगल ..हिरवळ झाली 60 टक्क्याने कमी

साम टीव्ही

मुंबई शहर काँक्रीटचं जंगल बनलंय कारण मुंबईत केवळ १३% हिरवळ उरली असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय त्यामुळं मुंबई महापालिकेचा आपली मुंबई- हरित मुंबईचा नारा फक्त कागदावरच राहिल्याचं समोर आलंय

देशाची आर्थिक राजधानी मुंबई गेल्या काही वर्षात मुंबईचा विकास झपाट्यानं झाला.छोट्या-मोठ्या चालींच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहिल्यात.एकीकडे मुंबईचा असा विकास होत असताना दुसरीकडे निसर्गाचा ऱ्हास झालाय.या ३० वर्षांत मुंबईतील ४२ टक्के जंगल नष्ट झालं असून केवळ 13 टक्के  हिरवळ उरलीय वातावरण फाउंडेशन या संस्थेच्या अहवालातून हे धक्कादायक वास्तव समोर आलंय


वातावरण फाउंडेशनच्या निष्कर्षानुसार  गेल्या ३० वर्षांत मुंबईतील ४२ टक्के जंगल नष्ट झालंय.गेल्या ४० वर्षांत मुंबईतील हिरवळ सुमारे ६० टक्क्यांनी कमी झालीय.. आता शहरात केवळ १३ टक्के हिरवळ  आहे...सर्वाधिक फटका गोरेगावला बसला आहे. २००१ मध्ये ६२.५ टक्के भागांत हिरवळ असलेल्या गोरेगावमध्ये २०११ मध्ये केवळ १७ टक्के हिरवळ उरली 

रस्ते दुरुस्ती,नवे प्रकल्प आणि इतर कामांमुळे झाडांवर संक्रात येतंय...यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला असून याकडे वेळीच लक्ष दिलं नाहीत तर मुंबईकरांवर मोठं संकट येऊ शकतं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Crime: पोलिसांचा अजब न्याय! तक्रार देणाऱ्याच्याच कानफटीत मारली; कानाचा पडदाच फाटला

गॅस कनेक्शन अपडेटच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक; कपडा व्यापाऱ्याला १४ लाखांचा गंडा

Siddharth Jadhav: सिद्धार्थ जाधव आठ वर्षांनंतर करणार रंगमंचावर एन्ट्री; 'ॲनिमल' नाटकात साकारणार दुहेरी भूमिका

Khichadi Recipe : डाळ खिचडी तर नेहमी खाता, एकदा ट्राय करा 'हा' खिचडीचा प्रकार; पोटही भरेल अन् पोषणही मिळेल

Maharashtra Live News Update: पुण्यातील बालगंधर्व चौकात एन एस यु आय चा आंदोलन

SCROLL FOR NEXT