jalna  
बातमी मागची बातमी

जालन्यात चक्रीवादळासह गारांचा पाऊस; शेतीचे मोठे नुकसान

MRUNALINI NANIWADEKAR

जालना : जालना Jalna जिल्ह्यातील परतूर Partur तालुक्यात चक्रीवादळासह Storm गारांचा अवकाळी पाऊस Heavy Rain झाल्याने शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संध्याकाळी सहाच्या सुमारास अचानक आलेल्या या चक्री वादळाचा केळी,मोसंबी,पपई,आंबा सह इतर पिकांना मोठा फटका बसला आहे. Hailstorm With Cyclone In Jalna Big Loss Of Agriculture

हे देखील पहा -

तर या चक्रीवादळामुळे अनेक घरावरील आणि गोठ्यावरील पत्रे उडाले आहेत. घरांचे आणि गाई-गुरांच्या गोठाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान Damage झाले आहे. मोठ्या प्रमाणत झाडे  उन्मळून पडली आहेत.

परतूर तालुक्यातील दैठणा बु,हरेराम नगर, दैठणा खुर्द ,येनोरा,खांडवीवाडी,माव या परिसरात संध्याकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने अनेक ठिकाणी विदूत पोल, तारा तुटून पडल्याने अनेक भागातील विद्युत प्रवाह ही खंडित झाला आहे. Hailstorm With Cyclone In Jalna Big Loss Of Agriculture

गारांचा जोरदार मारा झाल्याने सौर उर्जा पंपाच्या प्लेट ही फुटल्या आहेत. चक्रीवादळ आणि गारांच्या पावसाने जोरदार तडाखा दिल्याने पिकाला मोठा फटका बसलाय. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे.

महसूल विभागाने परिसरातील पिकांची तात्काळ पाहणी पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी देण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

SCROLL FOR NEXT