बातमी मागची बातमी

चीननं गिळलं भारतातील मोबाईल मार्केट, चिनी मोबाईलचा भारतीय बाजारात 66 टक्के ताबा

साम टीव्ही

तुम्ही मोबाईल वापरत असाल तर ही बातमी आवर्जून बघा. कारण भारताचं मोबाईल मार्केट चीननं कसं ताब्यात घेतलंय? हे पाहून तुम्हीही चक्रावून जाल

 आपल्या स्वार्थी आणि अप्पलपोट्या व्यापार धोरणामुळे चीनने जगभरातील बाजारपेठांवर ताबा मिळवलाय. इतर देशांतील उत्पादनांचा गळा घोटून चीननं जगभरातील बाजारात दबदबा निर्माण केलाय. मोबाईलविक्रीतही चीनचा हात कुणी धरू शकणार नाही अशी अवस्था निर्माण झालीय. कोरोनाच्या संकटाआधी भारतात चिनी मोबाईलची विक्री भारतात वेगाने वाढलीय.

 भारतीय मोबाईल बाजारात चीनचं साम्राज्य
भारतात चिनी मोबाईलची विक्री तब्बल 108 टक्क्यांनी वाढली. ती इतकी वाढली की भारतीय मोबाईल कंपन्यांचा टॉप 5 मध्येही समावेश नाही. याचाच अर्थ असा की भारतीय मोबाईल बाजारावर चिनी मोबाईल कंपन्यांचा तब्बल 66 टक्के ताबा आहे. स्वस्त मोबाईलचं आमिष दाखवत चीनच्या कंपन्यांनी हा ताबा मिळवलाय.
मोबाईल असो नाहीतर आणखी कोणत्याही वस्तू... चीननं भारतात जिथं संधी मिळेल तिथं हातपाय पसरलेत. त्यामुळे मोबाईलसह इतर वस्तू बनवणाऱ्या भारतीय कंपन्या अक्षरश: देशोधडीला लागल्यायत. अर्थात आता कोरोनाचं संकट आल्यामुळे सगळेच बाजार ठप्प आहेत. आणि कोरोनाच्या कटामागे चीनचा हात असल्याचा संशय जगभरात बळावतोय. त्यामुळे चिनी वस्तू वापरायच्या का याचा विचार आपण करायलाच हवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benifits of Ghee: जेवणामध्ये एक चमचा तूप; शरीराला आरोग्याचे वरदान

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांनी दिघेंना ठाणे जिल्ह्याचं अध्यक्षपद सोडायला भाग पाडलं, मुख्यमंत्री शिंदेंचा गंभीर आरोप

Today's Marathi News Live: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Sanjay Raut | कशाचा शोध घेतायत संजय राऊत?

Avinash Jadhav: खंडणीच्या आरोपानंतर अविनाश जाधवांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT