Government Jobs Saam Tv
naukri-job-news

Sarkari Nokri : भारत सरकारच्या विमा कंपनीत नोकरीची संधी, दरमहा 88 हजार पगार; अर्ज कधी आणि कुठे कराल? घ्या जाणून

Rohini Gudaghe

मुंबई : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी ही भारत सरकारची एक सर्वात जुनी कंपनी आहे. या कंपनीमध्ये काही पदे रिक्त असल्याचं समोर आलंय. शिवाय या नोकरीसाठी पगार देखील चांगला मिळणार आहे. या भरतीसाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइट www.newindia.co.in वर १० सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे.

भारत सरकारच्या कंपनी न्यू इंडिया ॲश्युरन्स (NAICL) मध्ये अधिकारी स्तरावर एक जागा रिक्त आहे. या रिक्त पदाची अधिकृत अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आलीय. www.newindia.co.in या अधिकृत वेबसाइटवर १० सप्टेंबर २०२४ पासून अर्ज प्रक्रिया सुरू (Sarkari Nokri) होत आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ सप्टेंबर २०२४ आहे. यासोबतच पुर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.

सरकारी नोकरीची संधी

न्यू इंडिया इन्शुरन्सची ही भरती स्केल I जनरलिस्ट आणि स्पेशलिस्ट श्रेणी अधिकाऱ्यांसाठी (NAICL Recruitment 2024) आहे. उमेदवारांना थेट अधिकारी स्तरावर नोकरी मिळवायची असेल, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे. कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत, याचा तपशील आपण जाणून घेवू या. अकाउंट पदासाठी ५०, जनरलिस्ट या पदासाठी १२० अशा एकूण १७० रिक्त जागा आहेत.

जनरलिस्टच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६० टक्के गुणांसह पदवी/पदव्युत्तर असणं आवश्यक आहे. राखीव प्रवर्गासाठी किमान गुण ५५ टक्के निश्चित करण्यात आले आहेत. तर अकाऊंट्ससाठी, उमेदवारांकडे CA/ICWAI किंवा MBA/PGDM/Finance/M.Com पदवी किमान ६० टक्के गुणांसह असावी. पात्रतेशी संबंधित इतर माहितीसाठी उमेदवार भरतीची अधिकृत सूचना पाहू शकतात.

कसं आहे स्वरूप?

या पदासांठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय २१ वर्षे आणि कमाल ३० वर्षे (Latest Job News) असावे. राखीव प्रवर्गांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात आलीय. निवड झाल्यास ८८ हजार पगार देण्यात येणार आहे. निवड प्रक्रिया पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशी तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. पुर्व परीक्षा १३ ऑक्टोबर २०२४ रोजी होईल आणि मुख्य १७ नोव्हेंबर २०१४ रोजी घेण्यात येईल. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. पूर्व परीक्षेत १०० गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले (Job News) जातील. यामध्ये इंग्रजी, रिझनिंग, क्वालिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस या विषयांवर प्रश्न असतील. तर पेपर II वर्णनात्मक स्वरूपाचा असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT