Government Jobs Saam Tv
naukri-job-news

Sarkari Nokri : भारत सरकारच्या विमा कंपनीत नोकरीची संधी, दरमहा 88 हजार पगार; अर्ज कधी आणि कुठे कराल? घ्या जाणून

NAICL Recruitment 2024 Latest Job News : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी मोठी संधी आहे. भारत सरकारच्या विमा कंपनीमध्ये रिक्त जागा आहेत.

Rohini Gudaghe

मुंबई : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी ही भारत सरकारची एक सर्वात जुनी कंपनी आहे. या कंपनीमध्ये काही पदे रिक्त असल्याचं समोर आलंय. शिवाय या नोकरीसाठी पगार देखील चांगला मिळणार आहे. या भरतीसाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइट www.newindia.co.in वर १० सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे.

भारत सरकारच्या कंपनी न्यू इंडिया ॲश्युरन्स (NAICL) मध्ये अधिकारी स्तरावर एक जागा रिक्त आहे. या रिक्त पदाची अधिकृत अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आलीय. www.newindia.co.in या अधिकृत वेबसाइटवर १० सप्टेंबर २०२४ पासून अर्ज प्रक्रिया सुरू (Sarkari Nokri) होत आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ सप्टेंबर २०२४ आहे. यासोबतच पुर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.

सरकारी नोकरीची संधी

न्यू इंडिया इन्शुरन्सची ही भरती स्केल I जनरलिस्ट आणि स्पेशलिस्ट श्रेणी अधिकाऱ्यांसाठी (NAICL Recruitment 2024) आहे. उमेदवारांना थेट अधिकारी स्तरावर नोकरी मिळवायची असेल, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे. कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत, याचा तपशील आपण जाणून घेवू या. अकाउंट पदासाठी ५०, जनरलिस्ट या पदासाठी १२० अशा एकूण १७० रिक्त जागा आहेत.

जनरलिस्टच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६० टक्के गुणांसह पदवी/पदव्युत्तर असणं आवश्यक आहे. राखीव प्रवर्गासाठी किमान गुण ५५ टक्के निश्चित करण्यात आले आहेत. तर अकाऊंट्ससाठी, उमेदवारांकडे CA/ICWAI किंवा MBA/PGDM/Finance/M.Com पदवी किमान ६० टक्के गुणांसह असावी. पात्रतेशी संबंधित इतर माहितीसाठी उमेदवार भरतीची अधिकृत सूचना पाहू शकतात.

कसं आहे स्वरूप?

या पदासांठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय २१ वर्षे आणि कमाल ३० वर्षे (Latest Job News) असावे. राखीव प्रवर्गांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात आलीय. निवड झाल्यास ८८ हजार पगार देण्यात येणार आहे. निवड प्रक्रिया पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशी तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. पुर्व परीक्षा १३ ऑक्टोबर २०२४ रोजी होईल आणि मुख्य १७ नोव्हेंबर २०१४ रोजी घेण्यात येईल. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. पूर्व परीक्षेत १०० गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले (Job News) जातील. यामध्ये इंग्रजी, रिझनिंग, क्वालिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस या विषयांवर प्रश्न असतील. तर पेपर II वर्णनात्मक स्वरूपाचा असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT