देश विदेश

ईअरफोन मुळे तरुणाने गमावला जीव; कानातच झाला ब्लास्ट

वृत्तसंस्था

जयपूर: लोकांच्या हातात मोबाईल Mobile आणि कानात सतत ईअरफोन Earphone लावून ठेवलेले असतात. बहुतेक लोक ईअरफोनचा Eaphones खूप वापर करतात. जेव्हा हातात मोबाईल धरून बोलणे शक्य असते तेव्हाही ते ईअरफोन लावून बोलत असतात. काही बहाद्दरांना तर दिवसभर ईअरफोन लावून गाणी ऐकत बसायची सवय असते. पण याच ईअरफोनने हो याच ईअरफोन ने एका तरुणाचा जीव घेतला आहे.

हे देखील पहा-

एका तरुणाच्या कानातच चक्क ईअऱफोनचा ब्लास्ट Blast झाला आहे. त्यानंतर तरुणाच्या कानातून भळाभळा रक्त वाहू लागले. यामुळे त्याचा मृत्यूही झाला आहे. ही धक्कादायक घटना आहे एका तरुणाची जो राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील उदयपुरिया गावातील आहे.

कानात ईअरफोन २८ वर्षांच्या राकेश नागरने घातले होते. माहिती आहे की, अचानक त्याच्या कानातच हा फुटला आणि त्यावेळी मोठा आवाज झाला. त्याच्या कानातून रक्त अति प्रमाणात वाहू लागले. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्याला मृत घोषित करण्यात आले आहे.

वृत्तानुसार, डॉक्टरांनी Doctors शक्यता वर्तवली की, त्याचा मत्यू हार्ट अटॅकमुळे झाला असावा. रुग्णालयातील डॉ. एलएन रूंडल यांनी सांगितले की, या तरुणाचा मृत्यू कार्डियाक अरेस्टमुळे झाला असावा. कानात अचानक ते फुटल्यामुळे त्याला अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

SCROLL FOR NEXT