New Maharashtra Sadan Water Shortage Saam TV
देश विदेश

VIDEO : केंद्रीय मंत्र्याला करावी लागली बिसलरीच्या पाण्याने अंघोळ; नवीन महाराष्ट्र सदनाला दिल्लीतील पाणी टंचाईचा फटका

Ruchika Jadhav

दिल्लीतील भीषण पाणीटंचाईचा सामना आता नवीन महाराष्ट्र सदनातील व्यक्तींना देखील सहन करावा लागत आहे. पाणी नसल्यानं दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राहणाऱ्या लोकांचे हाल होतायत. अशात पाणी संपल्यामुळे एका केंद्रीय मंत्र्याला थेट फिल्टर पिण्याच्या बॉटलने (बिसलरीच्या पाण्याने) अंघोळ करावी लागली आहे.

दिल्लीत पाणी नसताना महाराष्ट्र सदनाने कोणतंही नियोजन न केल्यानं सदनाच्या नियोजनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. या अगोदरही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशात आता देखील पाणीटंचाईने थेट केंद्रीय मंत्र्यांवर अशी वेळ ओढावली आहे.

राजधानीत भीषण पाणीटंचाई

एकीकडे उन्हाचा पारा वाढला आहे. देशभरात काही ठिकाणी हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवलाय. मात्र अद्यापही हवा तसा पाऊस पडलेला नाही. परिणामी राजधानी दिल्लीमध्ये भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे.

यमुना नदीतील पाणी पातळी मोठ्याप्रमाणात कमी झालीये. त्यामुळे दिल्लीवर पाणीटंचाईचं संकट ओढावलंय. त्यामुळे अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या मुद्द्यावरून ३१ मे रोजी केजरीवाल सरकारने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

राजधानीत पाण्याची समस्या भेडसावत असून हरियाणा, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांकडून एक महिनाभर अतिरिक्त पाणी देण्यात यावे, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Israel Iran War : इस्रायलच्या टार्गेटवर इराणी अणुभट्ट्या?, IDF ट्रुथफूल प्रॉमिस-2 करणार लाँच

Suryakumar Yadav: सूर्या भाऊ रॉक्स! मोठ्या रेकॉर्डमध्ये बटलरला सोडलं मागे; रोहित ऑन टॉप

IND vs BAN 1st T20I: टीम इंडियाची यंगिस्तान जोमात! हार्दिकचा फिनिशिंग टच अन् बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या ५व्या सीझनची Happy Ending; मात्र 'या' सदस्याचे केले भरभरुन कौतुक..

Bigg Boss Marathi 5 Jahnavi Killekar : बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर जान्हवीची पहिली पोस्ट म्हणाली, "७० दिवसाच्या प्रवासानंतर..."

SCROLL FOR NEXT