PM Narendra Modi Saam Tv
देश विदेश

PM Modi Press Meet: भारतावर जगाचा विश्वास- पंतप्रधान नरेंद्र मोदी

अधिवेशनात देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी उत्तम चर्चा व्हावी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: आजपासून संसदेचे (Parliament) अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) सुरु झाले आहे. यातच विरोधकांनी मोदी सरकारला (Narendra Modi) घेरण्याची तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी अधिवेशनामध्ये सर्वांनी चर्चा करावी आणि देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्याकरिता उत्तम चर्चा व्हावी असे आवाहन करण्यात आले आहे. (The world faith in India PM Modi)

हे देखील पहा-

अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. मी या अधिवेशनामध्ये सर्वांचे स्वागत करत आहे. आज वैश्विक स्तरावर भारताकरिता (India) खूप संधी आहे. देशाची आर्थिक प्रगती, लसीकरण (Vaccination) कार्यक्रम, मेड इन इंडिया वॅक्सिनविषयी जगात एक विश्वास तयार झाला आहे.

या अधिवेशनामध्ये यावर मुक्त चर्चा होणार आहे, जेणेकरुन जगभरामध्ये एक विश्वास तयार होणार आहे, अशी चर्चा व्हावी, असे यावेळी मोदी म्हणाले आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, सर्व राजकीय पक्षामधील सदस्य खुल्या मनाने उत्तम चर्चा करुन देशाला पुढे नेण्याकरिता नक्कीच मदत करणार आहेत. ही गोष्ट खरी आहे की वारंवार निवडणुकांमुळे (election) अधिवेशन प्रभावित होत असतात.

मात्र, मी सर्व सदस्यांना विनंती करतो की निवडणुका आपल्या जागी त्या चालत राहतील. मात्र आपण अधिवेशनात फलदायी चर्चा करणार आहोत. पंतप्रधान म्हणाले की, मुक्त आणि मानवी संवेदनांसह चर्चा करुन आगामी वर्षात नव्या आर्थिक उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT