वर्षभरापासून सुरु असणारं शेतकरी आंदोलन अखेर थांबणार ?
वर्षभरापासून सुरु असणारं शेतकरी आंदोलन अखेर थांबणार ?  Saam Tv
देश विदेश

वर्षभरापासून सुरु असणारं शेतकरी आंदोलन अखेर थांबणार ?

वृत्तसंस्था

संतोष शाळीग्राम (नवी दिल्ली)

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलन (Farmer Protest) संपवण्याची घोषणा लवकरच होऊ शकते. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारसोबतची चर्चा सकारात्मक दिशेने पुढे सरकल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारकडून (Central Government) शेतकऱ्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. सरकार एमएसपी हमी कायद्यावर समिती स्थापन करणार आहे. आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घेतले जातील, अशी ग्वाही सरकारने दिल्याचे समजते. उद्या आंदोलन स्थगित झाल्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. (The farmers' agitation which has been going on for a year will finally stop ?)

हे देखील पहा-

सरकारच्या प्रस्तावावर शेतकरी चर्चा करत आहेत. शेतकरी परतीच्या आंदोलनाबाबत निर्णय घेऊ शकतात. एमएसपीवर कायदेशीर हमीभाव, शेतकऱ्यांवरील खटले परत करावेत, शेतकरी आंदोलनात बळी गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, या मागण्यांवर शेतकरी लेखी हमी मागत होते.

सरकारने आंदोलक शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिले असून एमएसपी हमीभावासह त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलन स्थगित करण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पंजाब आणि दिल्लीच्या सीमेवर सुमारे 15 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मंदा म्हात्रे यांनी थेट राजीनामा नाट्यावर केला मोठा खुलासा

Maharashtra Election: नाशिक लोकसभा मतदारसंघात अवघ्या २४ तासात नवा ट्वीस्ट; समता परिषदेने घेतली नवी भूमिका

Benifits of Guar: अनेकांना नापसंत असणारी गवार आरोग्यासाठी आहे फायदेशीर

Ratnagiri Sindhudurg : विनायक राऊतांनी नारायण राणेंचा भूतकाळ काढला; अनेक गोष्टी सांगून टाकल्या!

Pimpri Chinchwad News Today: पिंपरी-चिंचवडमध्ये मर्सिडीजमध्ये चक्क 29 लाखांची रोकड आढळून आल्यानं आश्चर्य!

SCROLL FOR NEXT