Rahul Gandhi and Congress leaders stage a protest outside the Prime Minister’s residence in New Delhi over the NEET controversy and alleged police lathi charge on students. saam tv
देश विदेश

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम, लाठीचार्जवरुन घमासान, संसद ठप्प

NEET Controversy Sparks Political Storm: नीट आणि दिल्लीतील लाठीचार्जच्या मुद्यावरून सलग दुसऱ्या दिवशी संसदेचं कामकाज ठप्प झालं. त्यामुळे काँग्रेस आणि इतर विरोधक रस्त्यावर उतरले...दिवसभर काय घडामोडी घडल्या त्यावरचा हा रिपोर्ट

Girish Nikam

सीजेपीचं आंदोलन आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरुन दिल्लीतील वातावरण तापलंय. सलग दुसऱ्या दिवशी संसदेत याच मुद्यावरून विरोधकांनी सरकारला घेरलं. विरोधकांनी संसदेत लाठीचार्जचा मुद्यावर चर्चेची मागणी केली. मात्र अध्यक्षांनी त्यांची मागणी धुडकावून लावली. त्यामुळे काँग्रेस खासदारांनी थेट पंतप्रधानांच्या निवासस्थापर्यंत मार्च काढला आणि त्यांच्या निवसस्थानासमोर ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनात मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधीसह काँग्रेसचे सर्व खासदार सहभागी झाले. यावेळी काँग्रेस खासदारांनी स्वत:ला प्रतिकात्मक अटक करून सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली... त्यामुळे सरकारवर चांगलाच दबाव वाढला. त्यामुळे मंत्री जितेंद्र सिंह यांना राहुल गांधींच्या भेटीसाठी पाठवण्यात आलं. यावेळी जितेंद्र सिंह यांना राहुल गांधींनी आपल्य़ा पाच मागण्या सांगितल्या. कोणत्या आहेत या मागण्या ते पाहूयात...

काँग्रेसच्या 5 मागण्या

1. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा

2. आंदोलकांवरील लाठीचार्जची चौकशी

3. विद्यार्थ्यांच्या मुद्यावर अधिवेशनात चर्चा

4. गृहमंत्र्यांचं दोन्ही सभागृहात निवेदन

5. आंदोलनातील हिंसेची निष्पक्ष चौकशी

दरम्यान विद्यार्थ्य़ांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणावर संसदेत सत्ताधारी चर्चा करू देत नसल्याचा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गेंनी केला.. तर धर्मंद्र प्रधानच नव्हे लाठी चार्जचे आदेश देणाऱ्या गृहमंत्र्यांचा आणि ते ज्यांना रिपोर्ट करतात त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राजीनामा द्यायला हवा, असंही राहुल गांधींनी सांगितलं.

नीट पेपरफुटी प्रकरणावरुन कॉक्रोज जनता पार्टीने देशातील विविध ठिकाणी आंदोलन करुन शेवटी दिल्ली गाठली. पर्यावरणवादी आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचूक यांच्या उपोषणाने आंदोलनाची धग संपूर्ण देशात पसरलीय़. मात्र दिल्लीत आंदोलकांवरील लाठीचार्जमुळे मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसच्या हाती नवा मुद्दा आला. त्यामुळे धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीनं सुरू केलेल्या आंदोलनाचा शेवट काँग्रेस करणार असल्याचं दिसतंय. मात्र सरकारनं ना सीजेपीच्या आंदोलनाला जुमानलं ना वांगचुक यांच्या उपोषणाला..त्यामुळे आता राहुल गांधींनी मोदींच्या निवासस्थानासमोरील मांडलेल्या ठिय्याची तरी सरकार दखल घेणार का? याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT