India vs Pakistan saam tv
देश विदेश

India vs Pakistan: ऑपरेशन सिंदूरनंतर ऑपरेशन पीओके; POK खाली करा, भारताचा पाकला इशारा

India Warning To Pakistan: ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानात धुमाकूळ घातला गेल्यानंतर भारताचं लक्ष आता पाकव्याप्त काश्मीरकडे वळलं असून, पुढील रणनीतीसाठी हालचाली वेगानं सुरू झाल्यात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानमध्ये विध्वंस घडवला. आता ऑपरेशन सिंदूरनंतर भारतानं आपलं लक्ष पाक व्याप्त काश्मीरकडे वळवलंय. मात्र त्यासाठी राबवण्यात येणारं 'ऑपरेशन पीओके' नेमकं कसं असणार आहे? पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट.

ऑपरेशन सिंदूरनंतर भारतानं आता कुरापतखोर पाकिस्तानला थेट इशारा दिलाय. त्यामुळे पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि असीम मुनीरची झोप उडालीय. कारण भारतानं थेट पीओके जिंकण्याची रणनिती आखलीय. त्याचे संकेतच पंतप्रधान मोदींनी दिलेत.

भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून थेट पाकिस्तानला हादरवून सोडलंय. त्यामुळेच पाकनं अमेरिकेच्या मदतीनं शस्त्रसंधी घडवून आणली. मात्र भारतानं आता आणखी एक पाऊल पुढं टाकत पाकला पीओके खाली करण्यासाठी इशारा दिलाय. पाकिस्तानने पीओकेतून सेना माघारी घेण्यासाठी अल्टिमेटम दिलाय.

खरंतर पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा अत्यंत गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे पीओके जिंकण्यासाठी युद्ध हाच एकमेव पर्याय आहे. त्यापार्श्वभुमीवर भारतानं पीओके जिंकण्यासाठी ब्लू प्रिंट तयार केलीय. तर पीओकेवर भारतीय संविधानात काय म्हटलंय? पाहूयात.

जम्मू आणि काश्मीर भारतीय संघराज्याचा अभिन्न भाग

जम्मू आणि काश्मीरमध्ये संपूर्ण पीओकेचाही समावेश

एकमताने काश्मीर भारताचा भाग असल्याचा ठराव संमत

POK जिंकल्यास पीओकेतील नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळणार

भारतीय संविधानात पीओकेबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली असतानाही पाकने 1948 मध्ये पीओकेवर अवैध ताबा घेतलाय. मात्र आता पीओकेत तिरंगा फडकण्याची चिन्हं आहे. त्याची कारणं काय आहेत? पाहूयात.

काश्मीरच्या तुलनेत पीओकेमध्ये विकास नगण्य

POK मधील नागरिकांना सातत्यानं अन्यायपूर्ण वागणूक

उपासमारी आणि गरीबीमुळे पाक सरकारविरोधात नाराजी

दहशतवादी लाँच पॅडमुळे स्थानिकांमध्ये असंतोष

शाहबाज शरीफ आणि मुनीरच्या राजकारणामुळे लोकांमध्ये नाराजी

POK मध्ये पाकविरोधात बंडाची रणनीती

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं पीओकेमधील मुझफ्फराबाद आणि कोटली येथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. आता शस्त्रसंधीनंतर तीन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांनी राष्ट्रपतींची भेट घेतलीय. तर पंतप्रधान मोदीही सातत्याने सैन्यदलासोबत बैठका घेत आहेत. त्यामुळे भारताचं पुढचं लक्ष्य पीओके असणार आहे आणि ते साध्य होणार हे निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT